राजा म्हणाला, 'श्याम बोलतो, त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते. म्हणून सांगण्याला एक विशेषच माधुरी असते. म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो.
\"अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही. आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोक्ते आहेत. सगळाच रूपया शुध्द चांदीचा असेल, तर बाजारात चालत नाही. त्यात थोडी अशुध्द धातू मिसळावी लागते, तेव्हाच तो खण् वाजतो व व्यवहारात चालतो.' राम म्हणाला.
\"माझ्या मनात एक विचार आहे. तुला सांगू? तू हसशील.' राजाने विचारले.
राजा म्हणाला, 'श्याम बोलतो, त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते. म्हणून सांगण्याला एक विशेषच माधुरी असते. म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो.
\"अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही. आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोक्ते आहेत. सगळाच रूपया शुध्द चांदीचा असेल, तर बाजारात चालत नाही. त्यात थोडी अशुध्द धातू मिसळावी लागते, तेव्हाच तो खण् वाजतो व व्यवहारात चालतो.' राम म्हणाला.
\"माझ्या मनात एक विचार आहे. तुला सांगू? तू हसशील.' राजाने विचारले.